आरोग्यासाठी योग : योगश्चित्तवृत्तिनिरोध

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा) दि. २१ जून :  आरोग्यासाठी योग

योगेन चित्तस्य पदेन वाचा ।  मलं शरीरस्य च वैद्यकेन॥ योऽपाकरोत्तमं प्रवरं मुनीनां। पतञ्जलिं प्राञ्जलि रानतोऽस्मि॥ 

योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होय.

जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण जागतिक योग दिन म्हणून देशभरात साजरा करतो. योग हे प्राचीन शास्त्र किंवा विद्या आहे. या प्राचीन शास्त्राने केवळ आपली अमूल्य परंपरा समृद्ध केली नाही तर या शास्त्राच्या साधकांचे जीवन समृद्ध केले आहे. योग या शब्दाचा अर्थ एकमेकांशी जोडले जाणे. शरीर व मन जोडल्या गेल्याने आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक व सामाजिक घटकांना स्वतःशी जोडणे किंवा स्वयं अनुभवातून जोडणे म्हणजे योग होय.  महर्षी पतंजली यांनी ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’ अशा प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे. अर्थात योग आमच्या मनाच्या वृत्तीचा निरोध आहे. जेव्हा मानवाच्या मनाची वृत्ती पूर्णतः निरुद्ध होते, तेव्हा मानवाला समानता प्राप्त होते आणि तो निष्कामभावाने कर्म करण्यास प्रारंभ करतो  “स्थिरम् सुखम् आसनम्.” याचा अर्थ असा की दृढ आणि अनुकूल वाटणारी आसन म्हणजे तुमचे आसन.

महर्षी पतंजली यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाची आठ अंगे सांगितलेली आहेत.

योगात यम, सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह यांचे पालन आहे.  नियम शौच, संतोष तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचे ते अनुष्ठान आहे. योगासन म्हणजे विशिष्ट स्थितीत शरीर स्थिर करणे होय.

प्राणायाम हे मनाच्या शांतीचे साधन आहे. प्रत्याहार हा मनाला भोगांपासून परावृत्त करतो. धारणा हे एकाग्रतेचे नाव आहे. एकाग्रताने स्थिर होणे हेच ध्यान आहे. व्यक्तीचे परम चेतनेमध्ये सामावणे म्हणजेच समाधी.

योगाचे महत्त्व

योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. रोज योग केल्याने माणूस ताणतणावपासून दूर राहतो. इतकेच नाही तर माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय नियमित योग केले तर कोणत्याही आजारापासून माणूस दूर राहू शकतो. पण त्यासाठी ही गोष्ट नियमित करणे आवश्यक आहे. योगामुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात राहातो. त्यामुळे योग हा बऱ्याचशा आजारांना दूर ठेवतो.

ध्यानधारणा करणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही मिनिटे ध्यान लावून बसले की, माणसाच्या मनात आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे माणसाचे मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. तसेच पूर्ण दिवस मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहते; दिवसभराच्या तणावपासून दूर राहण्यास मदत होते.

प्रत्येक महिलेने पुरुषाने , तरुण तरुणी  बालक ( १२ वर्षे वरील )  वृद्ध यांनी स्वतःसाठी थोडा तरी वेळ कडून योग करावा व आपले जीवन आनंदमय आणि सुखमय करावे. आरोग्यासाठी योगासने खूप फायदेशीर आहेत. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते . योगामुळे तणाव कमी होतो, लवचिकता वाढते, आणि एकाग्रता सुधारते.

योगाचे फायदे :

शारीरिक आरोग्य  : योगासनांचा नियमित सराव लवचिकता सुधारतो आणि स्नायू आणि अस्थिबंधन मजबूत करतो. हालचालींच्या या वाढीव श्रेणीमुळे दुखापतींचा धोका कमी होतो आणि एकूण शारीरिक कार्यक्षमता वाढते. बैठी जीवनशैली किंवा पुनरावृत्ती हालचालींमुळे होणारे मुद्रा असंतुलन सुधारण्यास योग मदत करतो. ते योग्य संरेखनास प्रोत्साहन देते, सांधे आणि स्नायूंवरील ताण कमी करते आणि दीर्घकालीन वेदना कमी करते. नियमित योगाभ्यासामुळे चयापचय वाढतो, पचनक्रिया चांगली होते आणि भावनिक खाण्याच्या सवयी कमी होतात, त्यामुळे निरोगी वजन राखण्यास मदत होते. पाठदुखी, संधिवात आणि मायग्रेन यांसारख्या दीर्घकालीन वेदनांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी योग फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. शरीराची जाणीव आणि विश्रांती तंत्रांद्वारे वेदनांची जाणीव कमी करण्यास आणि वेदना सहनशीलता वाढविण्यास मदत करते

मानसिक आरोग्य  :  योगामुळे तणाव कमी होतो, मन शांत होते, आणि एकाग्रता वाढते. योगामध्ये मानसिकता आणि ध्यान पद्धतींचा समावेश आहे ज्यामुळे विश्रांती वाढते आणि ताण कमी होतो. ते पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते, शरीराची ताण प्रतिक्रिया कमी करते आणि शांतता आणि कल्याणाची भावना निर्माण करते. योगासने, जसे की लक्ष केंद्रित श्वासोच्छ्वास आणि ध्यान, मानसिक स्पष्टता, एकाग्रता आणि संज्ञानात्मक कार्य वाढवतात. नियमित सराव चिंता कमी करण्यास, स्मरणशक्ती सुधारण्यास आणि एकूण मानसिक कल्याण वाढविण्यास मदत करू शकतो. योग आत्म-जागरूकता विकसित करतो, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या भावना आणि विचार पद्धतींची सखोल समज विकसित होते. सजगता आणि ध्यान यांचा समावेश करून, योग व्यक्तींना त्यांच्या भावना प्रभावीपणे व्यवस्थापित आणि नियंत्रित करण्यास मदत करतो. योगामध्ये केल्या जाणाऱ्या अनेक श्वासोच्छवासाच्या व्यायामांचा विकास आपल्या विचारांच्या अंतहीन प्रवाहाला शांत करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी केला गेला आहे. यामुळे प्रत्येक आसनातून तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत असताना जास्त एकाग्रता येते – आणि बहुतेक प्रकरणांमध्ये, दिवसभर शांतता टिकते

हृदयविकार  :  नियमित योगामुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांचा धोका कमी होतो . डायनॅमिक फ्लो सिक्वेन्स आणि प्राणायाम तंत्रांसारख्या काही योगाभ्यासांमुळे हृदय गती वाढून, रक्ताभिसरण सुधारून आणि रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती सुधारू शकते.

प्रतिकारशक्ती : योग केल्याने प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे शरीर विविध रोगांशी लढण्यासाठी अधिक सक्षम होते. योगामुळे लसीका प्रणाली उत्तेजित होते, जी रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आसनांसह, खोल श्वास घेण्याच्या तंत्रांमुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास, लसीका प्रवाह सुधारण्यास आणि शरीराच्या संरक्षण यंत्रणेला चालना देण्यास मदत होते.

झोपेची गुणवत्ता सुधारणे : झोपेचा त्रास हा अनेकदा ताण आणि चिंता यांच्याशी संबंधित असतो. योगाच्या विश्रांती तंत्रे आणि माइंडफुलनेस पद्धती विश्रांतीला प्रोत्साहन देऊन आणि तणावाची पातळी कमी करून झोपेची गुणवत्ता सुधारू शकतात, ज्यामुळे व्यक्तींना अधिक शांत झोप मिळते.

श्वसनक्रिया  :  योगामुळे श्वसनक्रिया सुधारते आणि फुफ्फुसांची क्षमता वाढते, विशिष्ट श्वास घेण्याच्या तंत्रांमुळे, जसे की खोल पोटाने श्वास घेणे आणि नाकातून पर्यायी श्वास घेणे, फुफ्फुसांची क्षमता सुधारते, ऑक्सिजनचे सेवन वाढवते आणि निरोगी श्वसन कार्याला प्रोत्साहन देते.

नियमितपणे योगा केल्यास चांगले परिणाम मिळतात .  योगाचे अनेक प्रकार आहेत, जसे की हठ योग , राज योग , कर्म योग ,  ज्ञान योग , भक्ती योग , क्रिया योग,  अष्टांग योग,  अय्यंगार योग , कुंडलिनी योग . योग आणि आरोग्य यांच्यातील संबंध बहुआयामी आहे, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक कल्याण समाविष्ट आहे. शारीरिक आसने, श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान आणि सजगता पद्धतींच्या एकत्रीकरणाद्वारे, योग संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन प्रदान करतो. ते शारीरिक तंदुरुस्ती, लवचिकता आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते, तसेच ताण आणि चिंता कमी करते आणि भावनिक संतुलन वाढवते. योगाद्वारे वाढवलेले मन-शरीर संबंध व्यक्तींना त्यांच्या कल्याणात सक्रिय भूमिका घेण्यास सक्षम करते, एक सुसंवादी आणि संतुलित जीवनशैलीला प्रोत्साहन देते. परिणामी, जगभरातील लाखो लोक योगाला एक परिवर्तनकारी सराव म्हणून स्वीकारत आहेत जे संपूर्ण आरोग्याचे पालनपोषण करते आणि टिकवून ठेवते .

स्त्रीने योगाला महत्त्व देऊन आपले आरोग्यपूर्ण जीवन जगावे

महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या आणि  कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात . त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत जाते आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात. अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात आणि मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने मानसिक ताणतणाव वाढत जातो आणि स्वभाव चिडचिडा  होतो. मग मानसिकदृष्टया महिलेमध्ये एकटेपणाची भावना वाढून लागते डिप्रेशन येते. मग या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी महिलांनी  स्वतःला पण वेळ द्यावा. पुरेसा व्यायाम करावा, चालणे, योग करणे इत्यादी व्यायाम प्रकार करावेत किंवा स्वतःच्या जीवन शैलीचा तो एक भाग बनवून घ्यावा. रोज अर्धा एक तास योग केल्याने तर महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात वाढते वजन नियंत्रणात येते. विकार बरे होतात. वाढते शुगर, गर्भाशयाच्या तक्रारी इत्यादी .  योग वरदान म्हणून सिद्ध झाला आहे. अनेक आजार तर हार्मोन्स इन बॅलन्सने सुरू होतात. योग केल्यामुळे सर्व समस्या कमी होऊ शकतात आसनेन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, केल्याने महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. म्हणूनच समस्या निर्माण होण्याआधी सावध होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक स्त्रीने योगाला महत्त्व देऊन आपले आरोग्यपूर्ण जीवन जगावे.

महिलांना जीवन जगत असताना मनाची अवस्था चांगली असणे खूप गरजेचे आहे . मासिक पाळीची सुरुवात, गर्भारपण, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे या टप्प्यावर काहीतरी विशिष्ट मानसिक आजार होतात.त्यांना स्त्रियांमधील मानसिक आजार असे म्हणले जाते.  या टप्प्यावर स्त्रियांना मोठे शारीरिक मानसिक व सामाजिक बदल करावे लागतात.त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते. शरीरातील प्रत्येक कार्य मेंदूशी निगडित असल्याने या हार्मोन्सचा मेंदूवर परिणाम होतो. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे स्त्रियांना हे आजार होतात असे समजले जाते. पौगंडावस्थेमध्ये मुलींमध्ये उदासीनता, भित्रेपणा यासारखे आजार मुलांच्या तुलनेने जास्त दिसून येतात. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या थोड्या आधी किंवा त्या दरम्यान लहरीपणा, कंटाळाव अन्य त्रास होतात. काही स्त्रियांना हे त्रास तीव्रतेचे होतात. त्याशिवाय शरीर बोजड वाटणे, चिडचिडेपणा, उदासपणाव झोपेचे त्रास होतात. हे त्रास होताना स्त्रियांमध्ये टोकाचे बदल होतात. गर्भारपणात महिला आनंदी समाधानी असणे अपेक्षित असते. पण काही स्त्रियांना समाधान वाटते, कधी कधी स्वतः भीती वाटू शकते. हे सर्व त्रास नंतर वाढतात किंवा नव्याने सुरुवात होते . मासिक पाळी थांबण्याच्या वेळी बहुतेक स्त्रिया झोपेच्या तक्रारी अनुभवतात. वारंवार झोप नीट न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना अशक्तपणा, निरुत्साह, उदासीनता जाणवते. त्याला डोमिनो इफेक्ट्स म्हणतात. अशा झोपण्याच्या तक्रारीमुळे आणि इतर मेंदूतील बदलामुळे स्त्रियांना उदासीनतेचा आजार नव्याने होण्याची शक्यता असते. अलीकडच्या संशोधनात असे आढळून आले आहे की या वयात विस्मृतीचे लक्षण असू शकते या सर्व कारणांमुळे या वयात या स्त्रीने झोपेच्या त्रासाची दखल घेऊन वेळेत उपचार केले पाहिजे.  स्त्रियांच्या आरोग्यावर आणि स्थैर्यावर तिच्या कुटुंबाचे भविष्य अवलंबून असते. शारीरिक आरोग्यासाठी जसा उपचार सल्ला गरजेचा असतो ,  त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजी महत्त्वाची असते.

योग म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांना एकत्र आणणारी एक प्राचीन भारतीय प्रक्रिया आहे. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तसेच तणाव कमी होतो. योगामुळे शरीराची लवचिकता, ताकद आणि सहनशक्ती वाढते. योग तुमचे जीवन बदलतो आणि तुमचे क्षितिज अशा प्रकारे विस्तृत करतो की तुम्ही कधीही कल्पना करू शकत नाही.

युवराज फरांदे  ,  बारामती , निंबुत  

लेखक हे कर्वे समाज सेवा संस्था, पुणे येथे योग शिक्षण घेत आहेत.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा